Bharati Pawar
Bharati Pawar 
मुख्य बातम्या मोबाईल

केंद्राने लस दिली, मात्र राज्य सरकारमुळे नागरिक त्रस्त

संपत देवगिरे

नाशिक : कोरोना संक्रमणाची (Covid19 spreading fast in maharashtra) भयानक परिस्थिती सांभाळतानाराज्य शासनाच्या नाकी नऊ आले आहेत. त्यात केंद्र सरकारच्या वतीने सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा राज्य शासनाच्या (Centre supply vaccin bu state does`nt have Planing) अयोग्य नियोजनामुळे पुरता फज्जा उडाला आहे. हे अपयश झाकण्यासाठी राज्य सरकार  केंद्राकडे बोट दाखवत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. भारती पवार (BJP M. P. Bharti Pawar) यांनी केला आहे. 

त्या म्हणाल्या, राज्य सरकारचा नाकर्तेपणा स्पष्टपणे दिसत आहे. लस वाटपाचे  नियोजन हे  ठराविक भागास झुकते माप देण्याच्या राजकारणामुळे पुरते कोलमडले आहे. त्यामुळे  राज्यातील जनता लसीकरणापासून वंचित आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या असंख्य केंद्रांवर लसपुरवठ्याचा जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला जात आहे. त्याचा दोष केंद्र सरकारच्या माथी फोडला जात आहे. मात्र याराजकारणापायी सर्वसामान्य जनतेस फटका बसतो आहे. 

खासदार पवार म्हणाल्या, राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवत आहे.  लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे सूतोवाच केले  होते. मात्र घोषणा करून पंधरवाडा उलटून गेला असून ते फक्त एक आश्वासनच असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने हे हीन राजकारण थांबवून न्याय्य रीतीने सर्व जिल्ह्यांच्या गरजेनुसार लसपुरवठा करावा व नागरिकांना  सुरक्षित करावे.

यासंदर्भात त्यांना राज्य शासनाला निवेदन पाठविले आहे. त्यात त्या म्हणाल्या, केंद्र सरकारच्या नोंदींनुसार महाराष्ट्रास मिळणाऱ्या लसपुरवठ्यात कुठलाही भेदभाव केला जात नाही. आरोग्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यात ८ मे पर्यंत एक कोटी ७९ लाख ७१ हजार ९९३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. १० मे रोजी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडून एक कोटी ८२ लाख ५२ हजार ४५० मात्रा उपलब्ध झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे १० मे रोजी सकाळपर्यंत सात लाख १८ हजार ५६१ मात्रा राज्याच्या हाती होती. एक लाख १३ हजार ३३० मात्रा आहेत.  महाराष्ट्राला  लवकरच लस मिळणार आहे. शिवाय सुमारे दीड लाख मात्रांचा पुरवठा केंद्र सातत्याने राज्याला पुरवठा करत आहे. राज्य सरकारच्या नोंदीनुसार दररोज राज्यातील लसीकरणाची संख्या अडीच ते तीन लाख असेल, तर किमान आणखी तीन ते चार दिवस सर्व केंद्रांवर सध्याच्या क्षमतेने लसीकरण सुरळीत होण्यात कोणतीच अडचण नाही. असे असतानाही राज्यातील ठरावीक केंद्रे पूर्ण क्षमतेने लसीकरण करत आहेत, तर काही केंद्रांवर लसीचा खडखडाट आहे. 

उत्तर महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. नाशिक जिल्हा राज्यात नव्हे तर देशभरात सर्वात जास्त कोरोना संक्रमित शहरांच्या सूचित आहे. असे असतांना देखील गलिच्छ राजकारणामुळे लसींचा पुरवठा केला जात नाही. केवळ राजकारणापोटी जाणीवपूर्वक केली  जाणारी टंचाई नागरिकांच्या जिवाशी खेळ करणारी आहे. ती ताबडतोब थांबवावी. लस वाटपाच्या नियोजनातील गोंधळ थांबवून लसीचे न्याय्य वाटप करावे. जिल्ह्यातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे अन्यथा यासाठी आम्हाला पुन्हा मुबईत ठिय्या आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT