पाटणा : बिहार काँग्रेसमधील अंतर्गत खदखद समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्कारावा लागल्यापासून, प्रत्येक बैठकीत गदारोळ पाहायला मिळत आहे. याचप्रमाणे आज (मंगळवार) काँग्रेसच्या किसान मोर्चाच्या बैठकीत देखील चांगलाच धिंगाणा झाला.
बिहार काँग्रेसचे प्रभारी भक्तचरण दास यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी गदारोळास सुरुवात केली. यावेळी, काँग्रेस नेते राजकुमार शर्मा यांनी अन्य काँग्रेस नेत्याच्या अंगावर रागाच्या भरात खुर्ची फेकल्याचेही घटना घडली.
बिहारची राजधानी पटणा येथे दोन दिवसांपासून बिहार काँग्रेसचे नवे प्रभारी भक्तचरण दास हे दाखल झाले असून, ते पक्ष कार्यकर्त्यांसोबत सातत्याने बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी सदाकत आश्रम येथे काँग्रेसने किसान मोर्चाची बैठक बोलावली होती.
बैठकीस सुरुवात होताच त्या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये आपसात बाचाबाचीला सुरूवात झाली. याचे रुपांतर वादामध्ये झाले व याप्रसंगी किसान मोर्चाचे नेते राजू सिंह यांनी अन्य नेत्यांच्या अंगावर खुर्चीच फेकली. त्यामुळे बैठकीतील वाद वाढत गेला. या वादामुळे बैठक स्थगित करावी लागील.
भक्तचरण दास यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विधानसभा निवडणुकीत चुकीच्या पद्धतीने तिकीट वाटप केल्यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.