मुख्य बातम्या मोबाईल

शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपण्यांवर कारवाई करणार, कृषिमंत्री डॉ. बोंडेंचा इशारा 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ज्या पिक विमा कंपण्या शेतकऱ्यांना विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे अशा कंपन्यावर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे नवे कृषि मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी आज भेट घेतली असून भीषण दुष्काळ आणि शेतकऱ्यांना भेडसावणऱ्या समस्यावर त्यांनी चर्चा केली. 

ज्या विमा कंपन्या शेतकऱ्यांना नाडतात त्यांची नावे आपण जाहीर करणार आहोत पण, अधिवेशन असल्याचे आताच नावे जाहीर करता येत नसल्याचेही डॉ. बोंडे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्याबाबत यापूर्वी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. या कंपन्यांवर कारवाईचीही मागणी भाजप सरकारकडे केली होती. 

उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्रातील भीषण दुष्काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांवर मुख्य चर्चा झाली. तसेच राज्यात उशीरा दाखल होणाऱ्या मॉंन्सूनमुळे शेतकऱ्यांचे आणखी नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर शिवसेनेकडून चारा छावणीत राहाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजना सुरू करण्यात आली आहे. आता लांबलेल्या मॉंन्सूनमुळे जे नवे प्रश्नं निर्माण झालेत ते सोडवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्‍वासन डॉ. बोंडे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.. 

अविनाश महातेकर यांनी देखील घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, पण हीभेट घेऊन ते तातडीने निघून गेले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT