मुख्य बातम्या मोबाईल

पूर्वीच्या मित्राने सामना नीट वाचला असता तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ आली नसती : उद्धव ठाकरे 

सरकारनामा ब्युरो

नागपूर : शिवसेनेचे मुखपत्र असलेला सामना आम्ही बघत नाही आणि वाचतही नाही, असे म्हणणारे आमचे पूर्वीचे मित्र आणि आजचे विरोधक आज सभागृहात सामना दाखवत होते. त्यांनी सामना नेहमीच मन लावून वाचला असता, तर आमच्याशी "सामना' करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेता लगावला. 

शेतकरी-शेतकरी म्हणून गेले दोन दिवस सभागृहात गोंधळ घातला जात आहे. हे नुसतं नाटक आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाशी मी बांधील आहे, तो माझा आणि शेतकऱ्यांमधला, आम्हा दोघांचा प्रश्न आहे. तुम्ही करणारच पण आम्ही करून घेतले असे चित्र ज्यांना निर्माण करायचे आहे किंवा करायला लावले यासाठी विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आला आहे. आम्ही हाताची घडी घालून बसलेलो नाही असेही ठाकरे म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT