जळगाव : ''माजी मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री असलेल्या व्यक्तीने विद्यमान मुख्यमंत्री यांच्या बाबत काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे, मात्र हे भान हरपलेल्या नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात भरती करून शॉक दिला पाहिजे,'' अशी टीका शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर बोलताना मी असतो तर त्यांच्या कानात लगावली असती, असे वक्तव्य केले आहे, त्यावर शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की,राज्याचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांना मुख्यमंत्री पदाची गरिमा काय असते याची माहिती आहे. मुख्यमंत्री हा कोणत्याही एका पक्षाचा नसतो, तो संपूर्ण राज्याचा असतो त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काय बोलावे याचे त्यांना भान नसेल तर त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले पाहिजे वेळ पडली तर त्यांना शॉक सुध्दा दिले पाहिजे.
अंगातील भूत उतरवा
नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, त्यावेळीही विरोधी पक्ष होते, त्यावेळी त्यांच्याकडे एक गरिमा होती. परंतु आता गरिमा नसलेले विरोधी पक्ष येथे आला आहे.मला तर वाटते यांच्या अंगात काय चेटकीण घुसली की काय असे मला वाटते आहे. कोणत्या तरी भक्ताकडे नेऊन यांच्या अंगातील भूत उतरवण्याची गरज आहे.
राणेंची मला कीव येते
नारायण राणे यांनी वक्तव्या बाबत माफी मागण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त करून मंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्री यांची माफी मागण्याची ही लायकी राणे यांची नाही,बोलताना आपण काय बोलतो याचा त्यांनी विचार करावा त्यांनी कसे बोलावे हे मला त्यांना सांगावे लागते याचीच मला राणे यांची कीव येते.
Edited by : Mangesh Mahale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.