Gulabrao Patil
Gulabrao Patil 
मुख्य बातम्या मोबाईल

राज्यात तीव्र उन्हाळा तरीही कुठेही पाणीटंचाई नाही

सरकारनामा ब्युरो

जळगाव : राज्यात तीव्र उन्हाळा आहे, मात्र कुठे पाणी टंचाई नसल्याने टँकरची मागणी नाही अशी माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील टंचाईच्या स्थितीबाबत त्यांनी सांगितले, राज्यात विहिरी खोल करणे, अधिग्रहित करणे याची मागणी आहे, परंतु टँकर सुरू करण्याची मागणी अद्याप कोणत्याही भागात झालेली नाही. राज्यात किवा जळगाव जिल्ह्यात फार मोठी पाणी टंचाई असल्याचे चित्र आज तरी नाही.

कृषी कर्मचारी फ्रंट लाईन वर्कर
ते म्हणाले, राज्यात ज्याप्रमाणे पोलिस, आरोग्य कर्मचारी हे फ्रंट लाईन वर्कर आहेत, त्याच प्रमाणे कृषी कर्मचारी याना दर्जा देण्यात यावा असा प्रस्ताव आपण देणार आहोत. आगामी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मी स्वतः त्यासाठी प्रस्ताव देणार आहे. 

बोगस बियाणे विक्रीस आळा
परराज्यातील बोगस बियाणे राज्यात विक्रीसाठी येत असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या बोगस बियाणे विक्रीस आळा बसावा यासाठी राज्याच्या सीमेवर पथके तैनात करण्यात येतील. यासंद्रभात जळगाव जिल्ह्यात १५ पथके तयार करून प्रत्येक दुकानाची तपासणी करण्यात येईल.

बँकावर कडक कारवाई
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी बँकांनी कर्ज दिले पाहिजे. ते शेतकऱ्यांना मिळावे याकडे लक्ष दिले जाईल. जिल्हा बॅंकेसह ज्या बॅंका कर्ज देण्यास नकार देतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
....
हेही वाचा...

रुग्णसंख्या शूण्यावर येईपर्यंत कोरोनाशी लढाईसुरु राहणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT