मुख्य बातम्या मोबाईल

ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘अम्फान’ चक्रीवादळ

सरकारनामा ब्युरो

न्यूयॉर्क : भारताच्या पश्‍चिम बंगाल व ओडिशाच्या किनारपट्टीवर सध्या ‘अम्फान’ नावाचे चक्रीवादळ घोंघावत आहे. जगातील विविध भागात सातत्याने निर्माण होणारी ही चक्रीवादळे यापुढे अधिक तीव्र व प्रभावशाली असतील. याचे मुख्य कारण म्हणजे जागतिक हवामान बदल हे असल्याचे एका नव्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. 

संशोधकांनी शक्तीशाली संगणकांच्या मदतीने हवामानाचे प्रारुप तयार करून यापुढील वादळे ही अधिकाधिक जोरदार असतील, असा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजाच्या पुष्टीसाठी त्यांनी उपग्रहांनी पाठविलेल्या ४० वर्षांमधील छायाचित्रांमधील कल जाणून घेतला आहे. 

अमेरिकेतील ‘नॅशनल ओशिनोग्राफिक अँड जेम्स कोसिन यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले असून त्यासंबंधीचा अभ्यासलेख ‘प्रोसिडिंग ऑॅफ द नॅशनल ऑफ सायन्स’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाला आहे.  महासागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाची वारंवारता गेल्या दोन दशकात दुपटीने वाढली आहे, असे यात म्हटले आहे. 

वादळांमुळे नैसर्गिक आपत्ती 
अटलांटिक महासागराच्या प्रदेशात ‘हुरिकेन’, पूर्व प्रशांत महासागर पट्ट्यात ‘टायफून’ तर हिंद महासागराच्या भागात ‘सायक्लोन’ या संज्ञा चक्रीवादळासाठी वापरल्या जातात. प्रभावी उष्णकटिबंधीय चक्रीवादळांचे रूपांतर जगातील अतिशीत आणि भयावह नैसर्गिक आपत्तीमध्ये होत असते. यापुढी ही वादळे जास्त विनाशकारी ठरणार आहेत, असे अभ्यास लेखात सूचित केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT