devendra-fadnavis
devendra-fadnavis 
मुख्य बातम्या मोबाईल

फडणवीस म्हणतात, ``लोकांचा विश्वास असला की आपण येतोच! येतोच!! आणि येतोच!!!``

विलास काटे

आळंदी : सत्तेत असो अथवा नसो. सन्मार्ग सोडता कामा नये. सन्मार्गावर चालण्याचे टॉनिक आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत मिळते. हे टॉनिक घेण्यासाठी मी इथे आलो आणि हे मिळाले की पुन्हा एकदा सन्मार्गाने वाटचाल करत राहायची. लोाकांचा आशिर्वाद असला की तु्म्हाला कोण थांबवू शकतो. लोकांचा आशिर्वाद असला की आपण येतोच, येतोच आणि येतोच!, असे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फटकेबाजी केली.

वारकरी शिक्षण संस्थेच्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात `मी पुन्हा येईन`चा आत्मविश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आळंदीत बोलून दाखविला. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्तच्या हरिमान सप्ताहात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. 

ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत लोकांची जी काही सेवा करता आली त्याचे मला समाधान आहे. जिथे सेवा करण्याचे राहून गेले तिथे ईश्वराची इच्छा होईल त्यावेळी पूर्ण केली जाईल. वारकरी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात आल्यावर सगळ्यांचा आशिर्वाद मिळाला. यापेक्षा मोठी दुसरी गोष्ट नाही. असाच आशिर्वाद पाठीशी हवा. आमच्या हातून चांगली कामे व्हावीत. आम्ही सन्मार्गाने चालत राहावे हाच आशिर्वाद आपण द्यावा. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रासाठी चांगले काम केल्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा एकदा आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामधे सर्वाचा आशिर्वाद घेण्यासाठी येवू शकलो.``

शिक्षण संस्थेच्या सप्ताहात मी पुढच्या वेळीही पुन्हा येईन हे मी आवर्जून सांगतो, असेही सांगण्यास यावेळी श्री.फडणवीस विसरले नाहीत. फडणवीस यांच्या पुन्हा येईनच्या वक्त्व्याने पुन्हा एकदा उपस्थितांमध्ये हशा झाला आणि टाळ्या पडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT