मुख्य बातम्या मोबाईल

हिमत असेल तर राज्य सरकार बरखास्त करून दाखवा : नवाब मलिक 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : हिंमत असेल तर भाजपने सरकार बरखास्त करून दाखवावे असे आव्हान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला दिले आहे. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात हे सरकार आलेलं आहे. जनता हे केंद्र सरकारच्या कुटील रणनीतीला बळी पडणार नाही, याला विरोध करेल. कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकार चौकशी करीत आहे. अशोक चव्हाण यांच्या वक्‍त्यावर कोणीही नाराज नाही 

दरम्यान, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्‍मी शुक्‍ला मुख्यमंत्र्यांच्या भेट घेण्यासाठी गेले असून कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासासाठी "एनआयए'ची टीम पुण्यात पोहचली असल्याचे समजते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT