पंढरपूर : गावपातळीवर एकदम थेट संबंध असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. ही निवडणूक चुरशीची होत असतेच त्यामुळे तेवढाच संघर्ष होत असतो. पण सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मधील जैन वाडी ही पहिली ग्रामपंचायत आहे. ग्रामस्थांनी या सगळ्या गोष्टीला कंटाळून ४० वर्षात पहिल्यांदाच बिनविरोध केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी हे शेती मध्ये विविध प्रयोग करणारे गाव म्हणून ओळखले जाते. डाळींब, पेरू, ऊसाच्या प्रगतशील शेतीसाठी ओळख असूनही गावगाड्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मात्र संघर्ष ठरलेला होता. पंधरा दिवसांच्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीने पुढची पाच वर्ष वैरभाव कायम असायचा. गावच्या विकासात राजकारण, तक्रारी ठरलेल्या होत्या. किरकोळ वादविवाद सुध्दा पोलीस स्टेशन पर्यंत जाऊन गुन्हा दाखल व्हायाचा.
यामुळे गावातील जुन्या जाणत्या आणि तरूण कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेतली. जुन्या पिढीचा संघर्ष पुढच्या पिढीत नको म्हणून यंदाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायच ठरवले. ९ सदस्यां साठी तेवढेच अर्ज दाखल झाल्याने संघर्ष यंदा तरी थांबला आहे. निवडणुकीत वाया जाणारा पैसा, ईर्षा, याला अशा निर्णयामुळे ब्रेक लागला आहे.
Edited By - Amit Golwalkar
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.