Phaltankar
Phaltankar 
मुख्य बातम्या मोबाईल

इगतपुरीत अडकलेल्या रेल्वे प्रवाशांना दिली चहा अन् बिस्कीटे!

सरकारनामा ब्युरो

इगतपुरी : दोन दिवसांपासून अतिवृष्टी झाल्याने कसारा घाटात दरड कोसळली. (Land sliding in Kasara Ghat due to Heavy rain) त्यामुळे इगतपुरीहुन मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाड्या पहाटेपासून स्थानकातच थांबविण्यात आल्या. (Mumbai Railway traffic closed)  त्यामुळे प्रवासी रेल्वेतच अडकले. या प्रवाशांना आधार मिळाला, किरण फलटणकर (Kiran Phaltankar) या कार्यकर्त्याचा. त्यांनी या तीन हजार प्रवाशांना चहा-बिस्कीटे देऊन त्यांची क्षुधाशांती केली.  

रेल्वेस्थानकात अडकलेल्या या प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने सर्वच प्रवाशांना पुढील प्रवासासाठी लालपरीची (एसटी)  मदत घेत कल्याण व ठाण्यापर्यंत पोचविण्याचे काम सुरू केले होते. हे सुरू असताना जवळपास  तीन हजार प्रवासी बांधवांना जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने चहा-बिस्किटे  देण्यात आली. मध्य रेल्वेच्या कसारा घाटासह अन्य दोन ठिकाणी दरडी कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. रेल्वे प्रशासनाने पुढील प्रवासासाठी एसटी बसची व्यवस्था केली होती. मात्र अनेक प्रवासी पावसाने भिजले होते. इगतपुरीच्या प्रचंड पावसाच्या भागात हे प्रवासी थंडीने कुडकुडत होते. अनेक महिला प्रवाशांकडे लहान मुले होती. त्यामुळे हा उपक्रम राबविल्याचे श्री. फलटणकर यांनी सांगितले.

याप्रसंगी श्री. फलटणकर, शांतिलाल चांडक, वीरेंद्र परदेशी, सुभाष भारती, रामदयाल वर्मा, शैलेश शर्मा, आकाश खारके, सागर परदेशी, योगेश गुप्ता, कृष्णा करवा यांनी परिश्रम घेतले. 

यावेळी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार, परमेश्वर कासुळे यांच्या  आवाहनाला प्रतिसाद देत हा उपक्रम राबविण्यात आला.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT