Sarkarnama Banner - 2021-04-28T114723.148.jpg
Sarkarnama Banner - 2021-04-28T114723.148.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

लग्नसोहळ्यास १२५ जणांची उपस्थिती..५० हजारांचा ठोठावला दंड

सरकारनामा ब्युरो

लातूर : कोरोना संक्रमण काळात लग्न सोहळ्यावर अनेक निर्बंध  आहेत. दोन तासाच्या आत लग्न आणि 25 पेक्षा जास्त लोक नकोत असा नियम आहे, असे असतानाही लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव येथे वाजत गाजत लग्न लावण्यात आले. याची माहिती देवनी येथील तहसीलदार सुरेश घोळवे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ लग्न मंडपात जाऊन परिस्थितीची स्वत: पाहिली केली. त्यावेळी तेथे 125 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. 

प्रशासन हजर झाले असे लक्षात आल्याने मंडपातील अनेकांनी काढता पाय घेतला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव यांनी दंडात्मक कारवाई करण्यात आली. 50 हजारांचा आर्थिक दंड लावण्यात आला आहे. गट विकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव आणि भरारी पथकातील कर्मचारी यावेळी हजर होते. 

या वर्षी लॉकडाऊननंतर राज्यात ब्रेक द चेन अंतर्गंत अनेक निर्बंध लादण्यात आले आहे.  ५० जणांच्या उपस्थितीत सुरक्षित अंतर पाळून मंगलकार्यालयात लग्न सोहळ्याचे आयोजन याआधी करता येत होते. मात्र आता २५  पेक्षा जास्त लोक नको, अशी अट घालण्यात आली आहे. मागील वर्षी ऐन मार्च महिन्यातच करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानं अनेकांनी लग्न सोहळे पुढे ढकलले होते. त्यामुळं दिवाळीनंतर लग्न सोहळ्याची लगबग सुरू झाली. यंदाही मार्चपासून लग्न सोहळ्यास सुरवात झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT