Narayan Rane
Narayan Rane 
मुख्य बातम्या मोबाईल

कुणाला उद्देशून बोलले नारायण राणे की.... मी ज्येष्ठच आहे, कनिष्ठ नाही

सरकारनामा ब्युरो

नागपूर : ''राज्यातील जनतेला वाचवायचे असेल तर, महाविकास आघाडी सरकार पाडावे लागेल, असे काही जण म्हणत असले तरी असे करण्याची गरच नाही. कारण महाविकास आघाडीचे सरकार आपोआपच जाणार आहे, त्यासाठी कुणालाही फार काही करावे लागणार नाही,'' असे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज म्हणाले. एकाही करोनाग्रस्ताला मरु देणार नाही अशी धमक कुणात आहे का, असा सवालही त्यांनी केला. 

एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलताना सद्यस्थितीत महाराष्ट्रात सुरु असलेल्या घडामोडींबाबत राणे म्हणाले, ''मुनगंटीवार काय म्हणाले मला माहीती नाही. ते काय म्हणतात मी ऐकतही नाही. पण येवढे मात्र सांगू शकतो की ऑपरेशन लोटस होणार नाही.'' कोण श्रेष्ठी आणि कोण ज्येष्ठ, असा प्रश्‍न करीत मी पण जेष्ठच आहे, कनिष्ठ नाही. मी सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री होतो. काही काल-परवा राजकारणात आलेलो नाही, असे सांगत त्यांनी टिकाकारांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीचे सरकार आपोआपच जाणार असल्याचे त्यांनी ज्या खात्रिने सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नानाविध चर्चा सुरु झाल्या आहेत. 

संजय राऊत बेताल बोलतात 

संजय राऊत फार बेताल बोलतात. त्यांच्या बोलण्यात तारतम्य नसते. या सरकारच्या स्थापनेच्या पूर्वीपासूनच त्यांचे बोलणे वाढले आहे. कुणाच्या ईशाऱ्यावरुन त्यांनी बोलणे सुरु केले, हे देखील माहीती आहे. बेताल बोलण्यावर आता त्यांनी नियंत्रण ठेवायला हवे, असेही नारायण राणे म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT