Ashish Shelar
Ashish Shelar 
मुख्य बातम्या मोबाईल

किती वेळा मराठा समाजाच्या भावनेला नख लावणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर राज्य सरकारचा गोंधळ आहे. म्हणूनच पोलिस भऱतीमध्ये एसईबीसीच्या तरुणांचा विचार न करताच अध्यादेश काढण्याची हिंमत केली असा आरोप भारतीय जनतचा पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी केला.

राज्यातील पोलिस भरतीबाबत राज्य शासनाने मराठा समाजाच्या तरुणांचा विचार न करता स्वतंत्र अध्यादेश काढला होता. त्यावरुन मोठ्या प्रमाणात टिका होत होती. मराठा क्रांती मोर्चा तसेच विरोधी पक्षांकडून टिका झाल्यावर राज्य शासनाने हा अध्यादेश आता रद्द केला आहे. यासंदर्भात भाजपचे शेलार यांनी राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली. यासंदर्भात त्यांनी ट्विट करुन राज्य सरकारचा या विषयावर गोंधळ आहे, असे म्हटले आहे. 

शेलार म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत शासनाने न्यायालयात नीटपणे बाजू मांडली नाही. आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाहीत. समाजातील विद्यार्थ्यांना बाजूला ठेऊन प्रवेश प्रक्रिया केली. पोलिस भरतीचा अध्यादेश काढतानाही अशीच चुक केली. पोलिस भरतीमध्ये `एसईबीसी`च्या तरुणांचा विचार न करताच अध्यादेश काढला. यावरुन सरकारची नियत आणि इरादे स्पष्ट होतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, तरुणांना नोक-या, शिक्षणात संधी मिळावी  असे आघाडी सरकारला वाटत नाही. यामध्ये समाजा समाजात तेढ निर्माण करीत आहे की काय? असा संशय येतो. आता सरकारने पोलिस भरतीचा अध्यादेश रद्द केला मात्र अजून किती वेळा मराठा समाजाच्या भावनेला नख लावणार आहात असा प्रश्न त्यांनी केला. 
....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT