मुख्य बातम्या मोबाईल

मराठा आरक्षणाचा जल्लोष कसला करता, ज्यांनी आहुती दिली त्याचे काय ? 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा एटीआर विधिमंडळात मांडण्यात आल्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी एकीडे जल्लोष साजरा केला असला तरी मराठा समाजातील विशेषत: मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. 

मराठा आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहे का ? असा सवालही केला जात आहे. जे आरक्षण मंजूर करण्यात आले त्यावर आम्ही समाधानी नाही असे त्यांचे म्हणणे. गेल्या नऊ दहा दिवसापासून आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाचे नेते आंदोलन करीत आहेत. ज्या मुलांनी आपला प्राण मराठा समाजासाठी दिला आहे त्यापैकी एकाच मुलाला मदत मिळाली आहे. उर्वरित मुलांचे काय ? असा सवाल करण्यात येत आहे. 

आतापर्यंत चाळीस बेचाळीस तरूणांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. तसेच बारा हजार तरूणांवर गुन्हे आहेत ते प्रथम मागे घ्यावे. आरक्षणासाठी प्राण दिला आहे त्याचा विचार केला पाहिजे जल्लोष कसला करता असा सवालही मराठा नेत्यांतर्फे करण्यात येत आहे. 

आज सरकारने आरक्षण लागू केले असले तरी त्याबाबत राज्यपालांनी अध्यादेश काढावा अशी मागणीही काही नेते करीत आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT