43srnm5.jpg
43srnm5.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भाजपचं सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला का..राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. मात्र, हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे.  ज्या ठिकाणी भाजपचे सरकार नाही तेच अपयशी ठरले आणि जिथे भाजपचं सरकार आहे तिथे कोरोना पळून गेला, कारण तेथे भाजपचे सरकार आहे, असं काही नवीन धोरण केंद्राने तयार केले आहे का,'' असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. 

संजय राऊत म्हणाले, ''कोरोना संकटातही केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही.''
 
''मोदी यांच्या नेतृत्वाखाली धोरणाची ही लढाई लढली गेली आहे. मोदी यांच्या प्रत्येक सूचनेचे पालन राज्य सरकार करत आहे. 'प्राण जाये पर वचन न जाये' अशा पद्धतीने महाराष्ट्र सरकारने  कोरोनाविरूद्ध मोहीम राबवली आहे. संपूर्ण देशाचा भर महाराष्ट्रावर आहे स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहेत. गुजरात मधील भाजपच्या कार्यालयामध्ये हवी तेवढी रेमडेसिव्हीर मिळत आहेत. हे राष्ट्र एक आहे पण ते एक ठेवण्याचा प्रयत्न दिसत नाही.,''असे राऊत म्हणाले. 
 
''आंदोलन हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम असेल तर तो त्यांना करू द्या, एकीकडे महाराष्ट्रामध्ये अपयश असल्याचं केंद्र मंडळ तर दुसरीकडे अशा पद्धतीला भाजपचे नेते वागत असतील तर काय म्हणायचं. भाजपच्या मुख्यालयामध्ये जितके हवे असतील तितके रेमडेसिविर उपलब्ध आहे,'' अशी टीका राऊत यांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT