मुख्य बातम्या मोबाईल

भाजपमुळेच पीएमसी बॅंकेचा घोटाळा, राज ठाकरेंचा हल्लाबोल 

सरकारनामा ब्युरो

पुणे : भाजपमुळेच पीएमसी बॅंकेत घोटाळा झाला आहे. या बॅंकेवर कोण आहेत ? भाजपचीच माणसं आहेत असा हल्लोबोल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केले.तरूणांना रोजगार देणार होता त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी भाजप सरकारला केला. 

विधानसभेसाठी मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ सांताक्रुझ येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत राज यांनी चौफेर टोलेबाजी केली. प्रारंभी पुण्यातील पावसाचा अनुभव कथन करताना म्हणाले, की मी कोणाशी बोलतो, माझ्याशी कोण बोलतो हेच कळत नाही. ईडी चौकशीनंतर राज यांची आज मुंबईत ही सभा असल्याने राज्याचे याकडे लक्ष लागले होते. पुण्यात अर्धातास पाऊस पडून शहर उध्वस्त होत असेल तर करायचं काय ? यापुढे तर कोणी विचारले ना की कुठे राहता तर पुण्यात नव्हे तर पाण्यात राहता असे सांगा असा संतप्त सवालही त्यांनी केला. 

गेल्या पाच दहा वर्षात अनेक घटना घडत आहेत. कॉंग्रेसचे विरोधीपक्षनेतेच जर भाजपत जाणार असेल तर तुमचे प्रश्‍न मांडणार कोण ? तुमची खदखद मांडणार कोण ? सत्ताधारी पक्षातील आमदारांना तर ब्र काढता येत नाही. मला समाधानी माणूस कोण हे सांगा ? बॅंका बुडता आहेत ? लोक रडता आहेत? तुमचे हक्काचे पैसे काढता येत नाही. पीएसबी बॅंकेवर कोण भाजपची माणसं! शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी ओरडतो आहे. नुसत्या घोषणा द्यायच्या आणि जायचे. या देशातील न्यायालयाकडून तरी न्याय मिळणार आहे की नाही ? तुमचा आवाज आणि राग कोण व्यक्त करणार ? असा सवालही त्यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT