athawale-gawai-ambedkar.jpg
athawale-gawai-ambedkar.jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

भीमा कोरेगाव प्रश्नावर तरी आठवले - आंबेडकरांनी एकत्र यावे : डॉ राजेंद्र गवई

सरकारनामा न्यूज ब्युरो

मुंबई :" भीमा कोरेगाव येथे झालेला भ्याड हल्ला हा आंबेडकरी समाजावर आघात आहे. याच घटनेनंतर दलित समाज रस्त्यावर उतरला. यामध्ये आमच्या समाजातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्या निरपराध दलितांसाठी तरी ऍड.बाळासाहेब आंबेडकर व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकत्र यावे," असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी आज केले.

"भीमा कोरेगाव येथील घटनेनंतर 3 जानेवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात दलित समाजाने बंद पुकारला. या बंदमध्ये माझे सर्व पदाधिकारी व सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा सहभाग घेतला व अन्य गटाचे कार्यकर्ते ही रस्त्यावर उतरले. परंतु शांततेत बंद पार पाडून सुद्धा अनेक निरपराध आंबेडकरी जनतेला अटक करून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले," असा आरोप गवई यांनी केला आहे. 

सरकारवर दबाव आणण्यासाठी आंबेडकर व आठवले यांसोबत अन्य दलित नेत्यांनीही एकत्र यावे, असे आवाहन गवई यांनी आज येथे केले.

"आंबेडकर , आठवले यांनी एकत्रित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत बोलावे. ऐक्य होईल तेंव्हा होईल तसेच तुमचे मतभेदही कायम राहतील. परंतु खटले मागे घेण्यासाठी तरी निदान एकत्रित या", असेही गवई म्हणाले.

"यासाठी मी स्वतः बाळासाहेब आंबेडकर व रामदास आठवले यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे. तसेच मिलिंद एकबोटे यांना सुप्रीम कोर्टात अंतरिम जामिन मिळाला परंतु त्यांना कायमस्वरूपी जामिन मिळू नये, यासाठी सक्षम व अभ्यासू सरकारी वकील नेमण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे," असेही गवई यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT