मुख्य बातम्या मोबाईल

घेराव घालून सुभाष देशमुखांकडून पैसे वसूल करु : शेट्टी 

सरकारनामा ब्युरो

सातारा : किसन वीर कारखान्यासह राज्यातील पाच साखर कारखान्यांच्या जप्ती आदेशाला सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती आठ दिवसांत मागे घ्यावी, अन्यथा सहकार मंत्र्यांना घेराव घालून थकित एफआरपीचे पैसे वसुल करू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला. 

ज्या साखर कारखान्यांनी थकित एफआरपीची रक्कम दिली नाही, अशा राज्यातील सहा कारखान्यांवर साखर आयुक्तांनी मालमत्ता जप्तीचे आदेश काढले. त्याला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना आजपर्यंत थकित एफआरपी मिळू शकलेली नाही. एकुण 343 कोटींची थकबाकी असून 186 कोटी एकट्या सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांची आहे. त्यापैकी दहा कोटी सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल कारखान्यांची आहे. त्यामुळेच त्यांनी कारखान्यांवरील कारवाई बाबत धरसोडीचे धोरण अवलंबले आहे. सहकारमंत्र्यांनी येत्या आठ दिवसांत किसन वीरसह पाच कारखान्यांच्या जप्तीवरील स्थगिती उठविली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. प्रसंगी सहकार मंत्र्यांना घेराव घालून पैसे वसुल करू, असा इशारा त्यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT