मुख्य बातम्या मोबाईल

राममंदिरासाठी भाजप आणि इतर संघटनांचीआश्‍वासने वांझोटी : शंकराचार्य अधोक्षजानंद 

सरकारनामा ब्युरो

मथुरा : भाजप आणि इतर संघटनांनी अयोध्येला आंदोलनाचे केंद्र न बनवून वातावरण बिघडवू नये, मंदिरासाठीची त्यांची विधाने आणि आश्‍वासने वांझोटी आहेत,असे मत शंकराचार्य अधोक्षजानंद यांनी आज व्यक्त केले. 

अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी भाजप आणि इतर पक्ष, संघटना "वांझोटे प्रयत्न' करत असून मंदिरासाठी अध्यादेश आणणे आवश्‍यक आहे, 
मात्र, हे करतानाच मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण होणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयाला आव्हान दिले जाणार नाही, याची काळजी घेणेही आवश्‍यक आहे, असे ते म्हणाले. 

"राममंदिर उभारणीसाठी न्यायालयातील सुनावणीला वेग आणणे अथवा कायदा करणे हे मार्ग आहेत. मात्र, या वादाबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात रोजच्या रोज होत नसल्याने अध्यादेश आणण्याखेरीच मार्ग उरलेला नाही,' असे अधोक्षजानंद म्हणाले. 

भाजप आणि इतर संघटनांनी अयोध्येला आंदोलनाचे केंद्र न बनवून वातावरण बिघडवू नये, मंदिरासाठीची त्यांची विधाने आणि आश्‍वासने वांझोटी आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT