मुख्य बातम्या मोबाईल

स्वतः मोदी हातकणंगल्यात लढलेतरी शेट्टींचा विजय पक्‍का! 

सरकारनामा ब्युरो

इस्लामपूर (सांगली) : स्वाभीमानीतील बंडखोर आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. 

ते म्हणाले," स्वाभिमानी पक्षात फुट पडली जात असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे. परंतु ज्यांनी बंडखोरी केली ते मुळात अनेक वर्षापासून संघटनेपासून दूर आहेत. स्वाभिमानी विरोधात दिशाभूल करण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडून रसद पुरवून कुरघोडी करण्याचा डाव सुरु आहे. खासदार राजू शेट्टी चळवळीतून पुढे गेलेले नेते आहेत. संघर्ष हा स्वाभिमानीच्या पाचवीला पुजलेला आहे. शेट्टी यांच्या विरोधात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लढले तरी शेट्टींचा विजय पक्‍का आहे. आमचे तसे जाहीर आव्हान आहे. मोदींनी स्वतः येऊन लढावे.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT