मुख्य बातम्या मोबाईल

शेतकऱ्यांच्या संघर्षाला पाठबळ द्या : शरद पवार 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "देशभरातील शेतकरी गेली चार वर्षे होरपळत असताना मोदी सरकार मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करत नाही. या संतापानेच देशभरातला शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे सर्व समाजघटकांनी जात, पात, धर्म, पंथ बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे,'' असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले. तसेच, शेतकरी म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे, असेही ते म्हणाले. 

देशभरातील शेतकऱ्यांच्या संपाबाबत पवार म्हणाले, ""बळिराजा सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय करणे अशक्‍य झाले आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यातून शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या संघर्षाला सर्वांनीच पाठबळ देण्याची गरज आहे.'' 

"चार वर्षांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागोजागी सांगितले की, उत्पादन खर्च अधिक 50 टक्के फायदा हा शेतीमालाच्या किमतीचा आधार धरला जाईल आणि त्या पद्धतीने पावले टाकली जातील; पण या गोष्टीची अंमलबजावणी गेल्या चार वर्षांत झालेली नाही,'' असे पवार म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT