मुख्य बातम्या मोबाईल

भाजपच्या सत्ताकाळात खरंच सुखी झालो का, याचा विचार करा!

सरकारनामा ब्युरो

खटाव (सातारा) : भाजपच्या सत्ताकाळात खरंच सुखी झालो कां, याचा विचार जनतेने करण्याची वेळ आली आहे, असे मत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

खटाव येथे साकव बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप विधाते, पंचायत समिती उपसभापती संतोष साळुंखे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, पंचायत समिती सदस्य आनंदराव भोंडवे, बाळासाहेब इंगळे, राजेंद्र कचरे उपस्थित होते.

शशिकांत शिंदे म्हणाले, "पक्षाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील व्यक्तीला आमदार, मंत्री बनण्याची संधी दिली. शरद पवार यांच्यासोबत हुकूमशाही, दडपशाही प्रवृत्तीविरोधात लढायला आवडेल. राजकारणात दर्जेदारपणा, दिलदारपणा असावा. पण दांभिकपणा, संकुचितपणा वा खोटारडेपणा नसावा '' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT