uddhav thackrey
uddhav thackrey 
मुख्य बातम्या मोबाईल

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवली.. 31 जुलैपर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्यांना स्थगिती देण्याच्या निर्णयावरून महाआघाडी सरकारने घूमजाव केले आहे. या निर्णयात बदल करत आता कर्मचारी क्षमतेच्या 15 टक्क्यांपर्यंत बदल्यांना परवानगी आज वेगळया आदेशाने देण्यात आली. 31 जुलैपर्यंत या बदल्या करायच्या आहेत.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या 31 मे पर्य़ंत दरवर्षी करण्यात येतात. मात्र कोरोनामुळे त्या न करण्याच निर्णय घेण्यात आला. या बदल्यांसाठी 250 कोटी रुपयांची शासकीय बचत होऊ शकते, असा मुद्दा पुढे आला होता. त्यामुळे एक वर्षासाठी या बदल्या स्थगित करण्यात आल्या होत्या. मात्र या निर्णयावरून महाआघाडीमध्ये धुसफूस सुरू होती. अनेक आमदारांनी बदल्यांसाठी आग्रह धरला होता. त्यामुळे ही स्थगिती उठवत सक्षम प्राधिकरणामार्फत बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुंबईतील दहा पोलिस उपायुक्तांच्या बदल्या नुकत्याच झाल्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यात वाद झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यानंकर ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट काल झाली. त्यानुसार सर्वच विभागातील बदल्यांवरील स्थगिती उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला. 

शिक्षक, पोलिस, जिल्हा परिषद, कृषी या खात्यांत बदली होणाऱ्यांची मोठी संख्या असते. यासह राज्य सरकारचे विविध विभाग, अनेक महामंडळे यांचा विचार केला तर दरवर्षी किमान एक लाख अधिकारी आणि कर्मचारी यांची बदली होत असते. त्यामुळे हा निर्णय अनेकांसाठी दिलासादायक किंवा त्रासदायकही ठरू शकतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT