बीड : येत्या दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड मजुरांच्या कोयत्याला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. मात्र, जर सन्मानजनक न्याय मिळाला नाही, तर ऊसतोड कामगार आक्रमक होऊन दुर्गेचा अवतार घेतील, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
दरम्यान, काही काळ परदेशात असलेल्या पंकजा मुंडे नुकत्याच मुंबईत परतल्या आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा या विषयावर आपली भूमिका आक्रमकपणे मांडत संपाबाबत पुढील दिशा स्पष्ट केली.
मागच्या काही दिवसांपासून ऊसतोड मजुरांच्या दरवाढीचा आणि मुकादमांच्या कमिशन व सुविधांमध्ये वाढ करण्याच्या मागणीसाठी संप सुरू आहे. मागण्या मान्य होईपर्यंत कोयता हातात घ्यायचा नाही, अशी भूमिका ऊसतोड कामगारांच्या विविध संघटनांनी घेतली आहे.
याबाबत यापूर्वीही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत ऊसतोड कामगारांची व मुकादमांची बाजू लावून धरली आहे.
ऊसतोड कामगारांनी दरवाढीसाठी संप सुरू केला आहे. येत्या दुर्गाष्टमीपर्यंत ऊसतोड मजुरांना न्याय मिळेल, असा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पूर्वी साखर संघासोबत ज्या बैठका झाल्या, त्यात याविषयी मी आग्रही भूमिका मांडली आहे. तथापि, दुर्गाष्टमीपर्यंत मजुरांना न्याय मिळाला नाही, तर ऊसतोड मजूर दुर्गेचा अवतार घेतील, असा इशाराही त्यांनी दिला.
ऊसतोडणी मजुरीत वाढ व्हावी. तसेच, अन्य विविध मागण्यांसाठी ऊसतोड मजूर संपावर असले तरी लवकरात लवकर मागण्या मान्य नाही झाल्या तर मजूर आक्रमक होतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
Edited By Vijay Dudhale
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.