Ramdas_Athavle
Ramdas_Athavle 
मुख्य बातम्या मोबाईल

ठाकरेंना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, 'या' केंद्रीय राज्यमंत्र्यांची टिका

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महारष्ट्रात कोविड 19 या कोरोना महामारीला अस्थिर करण्याऐवजी स्थिर करण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. त्यामुळे हे सरकार अस्थिर झाले आहे. राज्यात विरोधी पक्षांना विश्वासात न घेणाऱ्या आणि कोरोनाला रोखण्यात स्पष्ट अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

कोणतेही नैसर्गिक मोठे संकट राज्यावर आले असताना राज्यातील सर्वांनी एकजूटीने संकटाचा मुकाबला करायचा असतो. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांची एकत्र बैठक घेऊन त्यांना विशेषतः विरोधी पक्षाला ही विश्वासात घ्यायचे असते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यास राज्यातील विरोधी पक्षाला विश्वासात घेतले नाही. कोरोनाच्या संकट काळात राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रियस्तरावर लॉकडाउन वर टीका करीत आहेत. लॉकडाउनमूळे देशात लाखोंचे प्राण वाचले  आहेत. कोरोनाची साथ रोखण्यात लोकडाउन उपयोगी ठरत आहे. त्यामुळे लॉकडाउनवर टीका करण्याचे राहुल गांधी यांचे राजकारण निषेधार्ह आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले. 

देशात सर्व राज्यांनी कोरोना रोखण्यात यश मिळविले आहे. मात्र, महाराष्ट्र्र सरकारला यश मिळाले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारण खेळत राहिले. राज्यात कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकार ला राज्यात सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री


 
ही बातमीपण वाचा : जूनमध्ये शाळा नकोच; पालकांचा विरोध 

कल्याण : येत्या १५ जूनपासून शाळा सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला होता; मात्र या भूमिकेला पालकांसह शिक्षणतज्ज्ञांनी तीव्र विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जूनमध्ये शाळा सुरू करायची की नाही? शाळेत पाळावयाचे नियम, शिक्षणपद्धती याबाबत आपली मते मुख्यमंत्री कार्यालयात ई-मेलद्वारे पाठवायला तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. जूनमध्ये शाळा सुरू करणे शक्‍य नसल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे, तर लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने जून महिन्यात आम्ही मुलांना शाळेत पाठवणारच नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू करायचे, यावर सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाला मार्गदर्शक सूचना पाठवण्यास तज्ज्ञांनी सुरुवात केली आहे. 

यामध्ये जूनपासून शाळा सुरू न करता दोन महिने कोरोना आजाराची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असे मत सरकारकडे नोंदविले जात आहे. ऑगस्टपर्यंतही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही तर वेगळा विचार करा, अशा सूचनाही केल्या आहेत. काहींनी सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करून ८० वार्षिक सुट्यांपैकी ७५ सुट्या रद्द कराव्यात; जेणेकरून अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असे मतही नोंदवले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT