मुंबई : आम्ही ३० तास नाहीतर ३० मिनिट मध्ये बहुमत सिद्ध करू, शेवटी सत्याचा विजय होणार आहे, आम्ही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. राज्यापालांच्या या निर्णयाविरुद्ध महाविकास आघाडी न्यायालयात गेली होती. दोन दिवसांच्या सुनावणीनंतर आज न्यायालयाने निकाल दिला. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करावेत, हंगामी अध्यक्ष नेमून उद्या लगेचच बहुमत चाचणी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. बहुमत चाचणी गुप्त मतदानाद्वारे घेऊ नये आणि त्याचे लाईव्ह टेलिकास्ट करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यावर राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, काल जे झालं ते शक्ती प्रदर्शन नव्हते. खरे बहुमत कोणाकडे आहे हे कळावं म्हणून काल केलेला सत्याचा एक प्रयोग होता, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुंबईत महाविकास आघाडीच्या आमदारांच्या एकत्रिकरणाचे समर्थन केले आज सकाळी पत्रकारांशी बोलताना केले. राऊत यांनी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्यावरही टिका केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.