भरत गोगावले यांच्या 'नॅपकिन वाटप' प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना ठाण्याचे आमदार आनंद परांजपे यांनी थेट शब्दात संताप व्यक्त केला.
"काल रायगडच्या भूमीतून पुन्हा एकदा कलीयुगातील मुगलांनी गरळ ओकली, हे नेहमीच युतीत घुसून आक्रमण करत असतात," अशा शब्दांत परांजपे यांनी अप्रत्यक्षपणे महेंद्र थोरवे आणि गोगावले यांच्यावर निशाणा साधला.
त्याशिवाय, "गुवाहाटीतील डान्स सर्वांनी पाहिलाच आहे," असा टोला देखील त्यांनी लगावला. त्यामुळे ठाणे आणि रायगडमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.