Shah Rukh Khan, Nawab Malik
Shah Rukh Khan, Nawab Malik sarkarnama
विशेष

नवाब मलिकांमुळे आज किंग खानला शांत झोप लागेल...

अमोल जायभाये

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी प्रकरणात क्लिनचिट देण्यात आली आहे. त्यामुळे आर्यन खानचा एकहाती किल्ली लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी जो एनसीबीचा (NCB) फर्जीवाडा उघड केला होता, त्यावर शिक्कामोर्तब झाले असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. (Aryan Khan Drugs Case Latest News)

आर्यन खानला एनसीबीने 2 ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबई किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टी छाप्यादरम्यान अटक केली होती. त्यानंतर जवळपास एक महिना तुरुंगात होता. त्यानंतर त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. एनसीबीने छापा टाकल्यापासूनच एनसीबीचे मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप करत हे प्रकरण फर्जीवाडा असल्याचे सांगितले होते. या छाप्यावर जाहीरपणे भूमिका मांडणारे नवाब मलिकच होते. मलिक यांच्या आरोपांमुळेच एनसीबीच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला होता.

मलिक यांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. त्यांनी समीर वानखेडे यांच्यावर विविध आरोप करत या प्रकरणाला वाचा फोडली होती. अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) याप्रकरणी सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणातून आर्यनची सुटका करण्यात आल्यानंतर मलिक यांचे आरोप बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकरणानंतर नवाब मलिक यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. सध्या मलिक तुरुंगात आहेत. त्यामुळे शाहरुख खान सुद्धा आज मलिक यांच्यासाठी नक्कीच दुवा मागत असले, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

एनसीबीने टाकलेली धाड हीच फर्जीवाडा आहे ते पहिल्या दिवसापासून मलिक यांनी सांगितले होते. तसेच या प्रकरणातील साक्षीदार आणि इतर एनसीबीने नेमलेले पंचही फर्जी होते शिवाय त्याच पंचांनी ते उघड केले होते. एका पंचाचा तर अनैसर्गिक मृत्यूही झाला आहे. शिवाय आर्थिक देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा समोर आली होती. त्यामुळे आज आर्यन खानला क्लीनचीट मिळाल्यानंतर नवाब मलिक यांनी घेतलेले आक्षेप बरोबर होते हे स्पष्ट होत आहे.

आर्यनला क्लिनचीट देताना एनसीबीने तीन ठोस कारणे सांगितली आहेत. 'एनसीबी'चे उपमहासंचालक संजय सिंह यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी 6 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात केली होती. या पथकाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एनसीबी वानखेडे यांच्यावर झालेल्या आरोपांचा तपासही पथकाकडून केला जात असून तो अंतिम टप्प्यात आहे. मलिक यांनी जो एनसीबीचा फर्जीवाडा उघड केला होता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT