Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
विशेष

Sakal Saam Survey : राज्यात काँग्रेस बळकट होतीय; राहुल गांधीची लोकप्रियता वाढतेय

सरकारनामा ब्यूरो

Narendra Modi Government Nine years Sakal survey : देशात २६ मे २०१४ रोजी 'एनडीए'चे सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकून पुन्हा केंद्रात भाजप मित्र पक्षांचे सरकार स्थापन झाले. या भाजपप्रणीत केंद्र सरकारला २६ मे २०२३ रोजी नऊ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 'सकाळ-साम'तर्फे महासर्व्हेक्षण करण्यात आला. या सर्व्हेक्षणात फक्त राज्यातील लोकांचा कल जाणून घेतला आहेत. त्यांनी विविध प्रश्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून राज्यात काँग्रेसला बळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.

'सकाळ-साम' महासर्व्हेक्षणात सुमारे ४९ हजार २३१ लोकांनी सहभाग घेतला आहे. यात राज्यातील २८८ विधानसभा, ४८ लोकसभेच्या मतदारसंघातील लोकांचा समावेश केला आहे. या लोकांमध्ये पिवळे शिधापत्र, केशरी शिधापत्र, अल्पउत्पन्न, माध्यमवर्ग , श्रीमंत अशा आर्थिक स्तरातील लोक सहभागी झालेले आहेत. या सर्व्हेक्षणात सर्व जाती, धर्मातील लोकांनीही सहभाग घेतला आहे. त्यामुळे या 'सकाळ-साम' महासर्व्हेक्षणाला महत्व आहे. दरम्यान, या सर्व्हेक्षणासाठी सकाळ समुहातील सुमारे दोन हजार लोकांनी परिश्रम घेतले. (Sakal Survey on Narendra Modi Government Nine years)

या सर्व्हेक्षणातून महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष (Congress) मजबूत होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व्हेक्षणात २०२४ ला कोणता पक्ष निवडून यावा असे वाटते? हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्यास प्रतिसाद देत दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला लोकांनी पसंती दिली आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना ३३.८ टक्के लोकांनी भाजप (BJP) पुन्हा निवडून यावा, असे मत व्यक्त केले आहे. तर १९.९ टक्के लोकांनी काँग्रेस निवडून यावी असे सांगितले आहे. त्याखोलोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) १५. ३ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. त्या खालोखाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला १२.५ टक्के लोकांनी पसंती दिली. शिवसेना (शिंदे गट) पुन्हा निवडून यावा असे फक्त ५.५ टक्के लोकांनाच वाटते.

या महासर्व्हेक्षणातून विरोधकांतील कोणत्या नेत्याला पंतप्रधान म्हणून प्रधान्य द्याल, असेही विचारण्यात आले. या प्रश्नाला सर्वाधिक ३४.९ टक्के लोकांची पसंती राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मिळाली आहे. राहुल यांच्यानंतर लोकांनी अरविंद केजरीवाल १२ टक्के, ममता बॅनर्जी ४.५ , नितीश कुमार ४.१, केसीआर २.९ , एम. के. स्टॅलीन १.८ टक्के अशी पसंती दिली आहे. सहभागी २३.२ टक्के लोकांनी 'यापैकी एकही नाही' असे उत्तर दिले आहे. तर १६.७ टक्के लोकांनी 'सांगता येत नाही' असे म्हटले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT