Sanjay Raut- Sachin Ahir
Sanjay Raut- Sachin Ahir Sarkarnama
विशेष

मला आणि सचिन अहिरांना पाडण्याचा बंडखोर आमदारांचा डाव होता : संजय राऊतांचा गौप्यस्फोट

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः राज्यसभेच्या निवडणुकीत संजय राऊत (Sanjay Raut) आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत सचिन अहिर (Sachin Ahir) यांना पाडायचा या बंडखोर आमदारांचा डाव होता. आम्हाला संजय राऊत यांना पाडायचे होते, हे गुवाहाटीमध्ये गेलेल्या शिवसेनेच्या (shivsena) आमदारांनी ऑफ दी रेकॉर्ड सांगितले आहे. सुहास कांदे यांचे एक मत ठरवून बाद करण्यात आले. आणखी दोन मते बाद करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, बाळासाहेबांच्या कृपेमुळे ती बाद झाली नाहीत आणि मी निवडून आलो, असा गौप्यस्फोट शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केला. (Rebel MLAs plotted to overthrow me and Sachin Ahir: Sanjay Raut)

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखातीत हा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीत मला पाडण्याचा पूर्ण प्रयत्न झाला होता. हे मी सांगत नाही, तर गुवाहाटमध्ये गेलेल्या आमदारांनी ऑफ दी रेकॉर्ड सांगितले आहे की, आम्हाला संजय राऊत यांना पाडायचे होते. माझा काहींना अडसर होत असेल. सध्या ज्या काही गोष्टी चालल्या आहेत, त्यामध्ये माझा अडसर आहे. त्यामध्ये मी भिंत म्हणून उभा असतो. संजय राऊत यांना पाडायचं ही भाजपची योजना होती. ते शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांच्या माध्यमातून करत होते. सुहास कांदे यांचे एक मत ठरवून बाद केले, ते कांदे आता गुवाहटीमध्ये आहेत. अजूनही दोन मते त्यांना बाद करायची होती. मात्र, बाळासाहेबांच्या कृपेमुळे ती होउ शकली नाहीत आणि मी खासदार म्हणून पुन्हा निवडू आलो.

राज्यसभेचे आमचे दुसरे उमदेवार संजय पवार यांना या लोकांनीच ठरवून पाडले. ते शंभर टक्के विजयी होऊ शकत होतात, हे लक्षात आल्यानंतर या लोकांनी मतं फिरवून पाडापाडीचे काम केले आहे, असेही संजय राऊत यांनी बोलताना स्पष्ट केले.

ते म्हणाले की, विधान परिषदेच्या निवडणुकीत सचिन अहीर आणि आमशा पाडवी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यातील सचिन अहीर यांना या लोकांना पाडायचे होते. मात्र ते शक्य झाले नाही. आमचा ३२ कोटा असूनही या अहीर आणि पाडवी या दोघांना २६-२६ चं मते मिळाली. त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, आम्ही त्यांचे डाव उधळून लावत या दोघांना विजयी केले.

भाजपने शिवसेनेचे ३७ उमेदवार पाडले

भाजपने विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे ३७ आमदार पाडले. आमशा पाडवी यांचा केवळ १३०० मतांनी पराभव झाला. त्या ठिकाणी भाजपने आपला माणूस बंडखोर म्हणून उभा केला. त्यामुळे पाडवी यांचा पराभव झाला. भाजपने असे उद्योग केले नसते तर आमचे ८० ते ८५ आमदार निवडून आले असते. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा आणि करारानुसार आमचा अडीच वर्षे मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्यांनी आमचे आमदार पाडले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT