Shivsena-satej Patil
Shivsena-satej Patil Sarkarnama
विशेष

शिवसेनेच्या मतांबाबत सतेज पाटील म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : ‘‘काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (ncp) गेल्या निवडणुकीत ९१ हजार मतं मिळाली होती, त्यामध्ये आता शिवसेनेची (shivsena) मते मिळालेली आहेत, त्यामुळे या पोटनिवडणुकीत मताधिक्क्य वाढताना दिसतं आहे,’’ अशा शब्दांत शिवसेनेच्या मताबाबत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाष्य केले. (Regarding Shiv Sena's votes, Satej Patil said....)

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे बोलत होते. त्यावेळी त्यांना शिवसेनेच्या नाराजीचा फटका या मताधिक्क्यामध्ये दिसून येतो का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पाटील यांनी वरील उत्तर दिले. पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढण्यासंदर्भात भाष्य केले होते.

महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला सोडण्यात आल्याचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यावेळी क्षीरसागर दोन दिवस नाराज होऊन अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर कोल्हापुरात येत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या मताबाबत संपूर्ण निवडणुकीत तर्क वितर्क लढविण्यात येत होते. मात्र, राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी प्रचारात सहभाग घेत जयश्री जाधव यांचा प्रचार केला होता.

मागील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे चंद्रकांत जाधव हे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना ९१ हजार ५३ एवढी मते मिळाली होती. तर शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना ७५ हजार ८५४ एवढी मते मिळाली होती. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना ९७ हजार ३३२ मते मिळाली असून भाजपच्या सत्यजित कदम यांना ७८ हजार २५ मते मिळाली आहेत.

सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापूरकरांनी इतिहास घडवला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात इतिहास घडला आहे. कोल्हापूरला जयश्री जाधव यांच्या रूपाने पहिल्या महिला आमदार मिळाल्या आहेत. शाहू महाराज यांच्या भूमीने पुन्हा एकदा समतेचा संदेश दिला आहे.

गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की, भाजपने धर्मा धर्मांमध्ये कितीही भांडणं लावली तरी एकत्रपणे लढलो तर आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असा हा कोल्हापूर पॅटर्न देशाने घेतला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आम्ही तिघांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ताकद दिली आणि कोल्हापूरच्या जनतेने योग्य असा कौल दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंनी सर्वधर्म समभावाची राज्यघटना देशाला दिली. त्या घटनेवर आता भाजपचा विश्वास आहे की नाही, याबाबतची भूमिका आता त्यांपनी जाहीर केली पाहिजे. ध्रुवीकरण आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या जनतेने हाणून पडला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT