विश्लेषण

'धनगरांना आरक्षण दिल्यास पाठिंबा काढण्याचा इशारा आदिवासी आमदारांनी दिलाय!' 

सरकारनामा ब्युरो

सांगली : राज्य सरकारने सत्तेत येण्यापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणी केली होती, आम्ही चार वर्षे वाट पाहिली. आता अंत पाहू नये. धनगर समाज रस्त्यावर उतरला आहे. आंदोलनाची तीव्रता वाढत निघाली आहे. काही दिवसांत सरकारला काम करणे अवघड होईल, अशी परिस्थिती निर्माण करू, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते, माजी मंत्री अण्णा डांगे यांनी दिला. 

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धनगर समाजाने धरणे आंदोलन केले. आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. 

डांगे म्हणाले,"भाजपचे सरकार अवघ्या 122 आमदारांसह आले आहे. बहुमतासाठी त्यांच्याकडे 22 जागा कमी आहेत. शिवसेनेच्या टेकूवर सरकार चालले आहे. शिवसेना कशी वागते, साऱ्यांना माहिती आहे. अशावेळी धनगर समाजाला आरक्षण द्याल तर आम्ही पाठींबा काढून घेऊ, असा इशारा आदिवासी समाजातील आमदारांनी दिला आहे. आता आमच्या आरक्षणासाठी भाजप सरकार पाडून घेईल, असे वाटत नव्हते. त्यामुळे आम्ही चार वर्षे सबुरीने घेतले. आता शेवट आला आहे. एक वर्षात हा विषय मिटला नाही तर सरकारने आमची फसवणूक केली हे स्पष्ट होईल. त्यामुळे जे काही असेल तर आताच, अशी भूमिका घेऊन समाज रस्त्यावर उतरला आहे. सरकारची अपरिहार्यता आम्ही समजून घेतली, आता अंत पाहू नये.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT