विश्लेषण

अटलबिहारी वाजपेयी अमर रहे : लाडक्या लोकनेत्याला प्रचंड गर्दीत शेवटचा निरोप

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात दिल्ली येथी राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. थोर मुत्सद्दी, देशभक्त नेता, प्रभावी वक्ता, कवी मनाचा पण कठोर निर्णय घेणारा प्रशासक आज काळाच्या पडद्याआड गेला.

नवी दिल्ली बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी रस्त्यावर आली होती. राष्ट्रपतींपासून ते सामान्य नागरिकांच्या मनात वाजपेयींनी घर केले होते. हे प्रेम व्यक्त करण्यासाठी, आवडत्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा अाणि अन्य मंत्री तर अंत्ययात्रेत पायी चालत सहभागी झाले. अटल बिहारी वाजपेयी अमर रहे, अशा घोषणा देत गर्दीने त्यांना श्रद्धांजली वाहिली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवानी, मनमोहनसिंग, राहुल गांधी, विविध राज्यांचे राज्यपाल, सार्क देशांचे प्रतिनिधी आदी प्रमुख या अंत्यसंस्काराच्या वेळी प्रसंगी उपस्थित होते. सुरक्षा दलाच्या ३०० जवानांनी वाजपेयी यांना मानवंदना दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT