विश्लेषण

मुख्यमंत्र्यांनीही आता बेसन भाकरच खावी - बच्चू कडू

महेश घोराळे

औरंगाबाद : भाजीपाला आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ तीन दिवस संप कायम ठेवला तरी सरकारला त्याचा परिणाम दिसून येईल. मुख्यमंत्र्यांनीही आता बेसन भाकरच खावी, गरज भासल्यास मुख्यमंत्र्यांच्या घराकडे जाणारा भाजीपालाही थांबवू, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी "सरकारनामा'शी संवाद साधला. 

तीन ते चार दिवस शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध विकू नये. दूध फेकण्यापेक्षा त्याचे कलाकंद, पेढे, तूप तयार करा, पण विकू नका. तेव्हाच सरकारला परिणाम जाणवेल, असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. भाजपच्या नेत्यांमध्ये सत्तेची मस्ती आहे. निवडणूक जिंकली म्हणजे सर्व काही झाले, अशी भूमिका घेणे चुकीचे आहे. उत्तरप्रदेशात कर्जमुक्ती होऊ शकते तर, महाराष्ट्रात का नाही ? केंद्र सरकारने याबाबत धोरण आखले पाहिजे, असेही ते म्हणाले.

भाजपचे काही प्रवक्ते म्हणतात की, या संपाचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत जागा निवडून आल्या तर, भाजपला वाटते की आपला प्रभाव आहे, पण हा पैशांचा प्रभाव आहे, अशी टीका आमदार कडू यांनी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT