विश्लेषण

शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांकडून उच्चाधिकार मंत्रिगटाची स्थापना

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन तापल्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भात राज्यातील विविध शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे. 


राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते हे या उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य असतील. हा उच्चाधिकार मंत्रिगट सर्व शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार असून त्यांच्या सर्व मागण्यासंदर्भात आपला प्रस्ताव निर्णयार्थ शासनाकडे सादर करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 


कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक चर्चेतूनच होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांसंदर्भात शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याची शासनाची तयारी आहे, याचा पुनरुच्चार श्री. फडणवीस यांनी केला आहे. त्यानुसार या उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती करण्यात आली आहे. शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT