विश्लेषण

सातारा लोकसभेच्या निकालाची फक्त औपचारिकता : पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो

कराड : सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल मतदारांनी आपल्या मनात घेतलेला आहे, प्रचाराची आणि मतदानाची फक्त औपचारिकता बाकी राहिलेले आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कराडमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

ते म्हणाले, महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक ही राज्याचे भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. ही निवडणूक जनतेच्या पोटापाण्याच्या प्रश्नावर, विकासाच्या मुद्द्यावर, तरुणांच्या रोजगाराच्या प्रश्‍नावर, अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीविरोधात आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्ष लढवणार आहोत. सातारा ही क्रांतिकारकांची भूमी आहे. यशवंतराव चव्हाण यांनी त्याला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनता हा अपमान सहन करणार नाही, त्यामुळे मतदान कोणाला करायचं हा निर्णय सातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी घेतलेला आहे. कॉंग्रेस जाहीरनामा येत्या दोन दिवसात जाहीर केला जाईल. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT