विश्लेषण

चित्राताई भाजपत आल्याने राष्ट्रवादीत महिला नेतृत्व उरले नाही : फडणवीस 

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा चित्राताई वाघ भाजपमध्ये आल्याने राष्ट्रवादीत महिला नेतृत्वच उरलेले नाही,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी झालेल्या प्रवेश सोहळ्यात बोलताना म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपत येत असलेल्या मधुकरराव पिचड ते कालिदास कोळंबकर या सर्वांविषयी गौरवोद्‌गार काढले. 

चित्राताई वाघ यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, " चित्राताई वाघ यांच्या पक्ष त्यागाची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना घ्यावी लागली यातच सर्व आले. सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय घेऊन संघर्ष करणे आणि तो विषय टोकाला नेऊन संबंधित घटकाला न्याय मिळवून देणे ही त्यांची कार्यशैली आहे. आधी मंदाताई म्हात्रे भाजपत आल्या आणि आज चित्राताई वाघ भाजपत आल्या. त्यामुळे राष्ट्रवादीत महिला नेतृत्व उरलेले नाही.'' 

कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केलेले कालिदास कोळंबकर यांच्याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, " कोळंबकर हे सात वेळा आमदार राहिले आहेत. सर्वसामान्यांत मिसळून काम करणारा हा नेता आहे. मिल कामगार आणि पोलिसांची कामे झाल्याशिवाय हा माणूस शांत बसत नाही. गेल्या चार-पाच वर्षांत अनेक वेळा ते गिरणी कामगार आणि पोलिसांच्या घराचे आणि इतर प्रश्‍न घेऊन माझ्याकडे आले. माझ्या पाठीमागे लागून त्यांनी पोलिसांचेही अनेक प्रश्‍न सोडवून घेतले आहेत.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT