विश्लेषण

गुणगान विरुद्ध चिखलफेक...मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीचा राजकीय आखाडा 

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कामाची जंत्री विरुद्ध आरोपांच्या फैरींचा राजकीय आखाडा रंगतो आहे. सरकारतर्फे मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कामांचे गुणगान केले आहे; तर या सरकारचे वर्णन विश्‍वासघात, चलाख्या, सूडबुद्धी आणि खोटारडेपणा या चार शब्दांत करावे लागेल, अशी चिखलफेक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे. 

2019 मध्ये देशाला कामदार, इमानदार आणि जिम्मेदार पंतप्रधान मिळेल, असा टोला काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी भुवनेश्‍वरमध्ये लगावला, तर 2019 मधील निवडणूक मोदी विरुद्ध अराजकवाद्यांची आघाडी अशी असेल, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले. सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभरात 'विश्‍वासघात दिन'ही पाळला. 

सरकारचे गुणगान... 
- "मुद्रा'सारख्या प्रयोगातून नऊ कोटी व्यक्तींना स्वरोजगारप्राप्ती 
- स्टार्ट अप, स्टॅंड अप इंडियासारख्या योजनांद्वारे रोजगारनिर्मिती 
- आर्थिक शिस्त आणि कल्याणकारी कार्यक्रम यांच्यात शिस्त 
- देशाला निर्णायक नेतृत्व, भ्रष्टाचारमुक्त सरकार 
- घराणेशाही, अनुनयाचे राजकारण संपविले 

कॉंग्रेसच्या फैरी... 
- हे सरकार म्हणजे वर्णन विश्‍वासघात, चलाख्या, सूडबुद्धी आणि खोटारडेपणा 
- रोजगारनिर्मिती, कृषी, इंधनाचे वाढते दर, परराष्ट्र धोरणाच्या आघाड्यांवर अपयश 
- घोषणाबाजी आणि स्वबढतीत मोदींना पहिला क्रमांक 
- स्वप्रसिद्धीवर सरकारची 4600 कोटी रुपयांची उधळपट्टी 
- अमित शहांच्या मुलाच्या भ्रष्टाचारावर भाजपचे मौन 
- राफेल विमानांसाठी जादा किंमत मोजावी लागणार 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT