विश्लेषण

नारायण राणेंचं स्वप्न दीपक केसरकरांनी पूर्ण केलं : फडणवीसांचा चिमटा

सरकारनामा ब्युरो

सिंधूदुर्ग : कोकणात माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यातून विस्तव जात नाही. त्यात राणे आता भाजपबरोबर आहेत आणि केसरकर भाजप-सेना युतीमध्ये. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज खोचकपणे आपण दोघांच्याही बाजूचे आहोत, अप्रत्यक्ष सांगत दोघांनाही चुचकारले.

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडवणीस यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी व्यासपीठावर राणे, केसरकर, सुरेश प्रभू आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंधूदुर्ग जिल्ह्यात विमानतळ व्हावा हे नारायण राणे यांचे स्वप्न होते आणि ते केसरकर यांनी पूर्ण केलं असे खोचकपणे सांगितले. मात्र, हे आपल्याच पाठिंब्यामुळे झाले हे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "रत्नागिरी विमातळाचा एमओयू झालाय. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य़ हे आहे की नारायण राणे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केसरकर यांनी घेतला आणि त्याला पूर्ण पाठिंबा मी दिलेला आहे. त्यामुळे आता या विकासाच्या गाड्याला कुणी थांबवू शकत नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT