विश्लेषण

 अटलजींमुळे मी मुख्यमंत्री बनलो : मनोहर जोशी 

सरकारनामा ब्युरो


पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. या दोघांमध्ये हजरजवाबीपणा होता असे स्पष्ट करतानाच मी 1995 जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याचे श्रेय वाजपेयींनाही जाते अशी कबुली माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आज दिली. 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोशी म्हणाले, की शिवसेना आणि भाजपची पंचवीस वर्षाहून अधिक काळ युती टिकली ती वाजपेयी आणि बाळासाहेबांमुळे. हे दोन्ही नेते भिन्न स्वभावाचे होते. पण, युतीमध्ये कधी टोकाचे मतभेद बनले नाहीत. राज्यातून जेव्हा राष्ट्रीय राजकारणात गेलो तेव्हाही मंत्री, लोकसभेच्या सभापतीसह अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले. त्यावेळी वाजपेयी यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT