विश्लेषण

चाकणला कॉ. भास्कर मरता मरता वाचला, तसे कोल्हापुरात करु नका : नांगरे पाटील 

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : "चाकणमधील तणाव हाताळण्यास गेलो होतो. कॉन्स्टेबल अजय भास्कर याच्या डोक्‍यात रॉड घातला गेला. तो मरता मरता वाचला. अशा घटना कोल्हापुरात घडू नयेत', अशी अपेक्षा विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी व्यक्‍त केली. 

#MarathaReservation 

9 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर नांगरे पाटील यांनी समन्वय बैठक घेतली. मराठे लढाईत जिंकतात, पण तहात हारतात, असा दाखला देत सकल मराठा समाजाने आंदोलनाबाबत सकारात्मक विचार करावा, अशी विनंती श्री. नांगरे-पाटील यांनी केली. आंदोलकांनी आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतली. चाकणमधील तणाव हाताळण्यास गेलो होतो. कॉन्स्टेबल अजय भास्कर याच्या डोक्‍यात रॉड घातला गेला. तो मरता मरता वाचला. अशा घटना कोल्हापुरात घडू नयेत, असे आवाहनही नांगरे-पाटील यांनी केले. 

यावेळी दिलीप देसाई म्हणाले, "नऊ ऑगस्टला कोणतीही तोडफोड होणार नाही. आपल्या माणसांना त्रास होईल, असे कोणतेच वर्तन आम्ही करणार नाही. पोलिस प्रशासनाने कायदा राबवावा. आम्ही तो पाळतो.'' 

कर्नाटक पोलिसांचा मराठ्यांवर राग आहे. नऊ ऑगस्टला तेच आंदोलनास गालबोट लावतील. मराठ्यांना ठोकून काढतील. त्यांची व्हॅन आम्ही पाहिली आहे. त्यांना बंदोबस्तासाठी कोल्हापुरात आणू नका, अशी विनंती देसाई यांनी यावेळी केली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT