विश्लेषण

उदयनराजेंचे बालीश चाळे पवारांनी सहन केले होते - जितेंद्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यावर पोटच्या पोरासारखे प्रेम केले आणि छत्रपतींचे वंशज व राजे म्हणून त्यांना सतत मान दिला, अत्यंत उमदेपणाने आणि त्यांचा मान राखण्यासाठी त्यांचे अनेक बालीश चाळे सहन केले होते. पक्षातील अनेकांचा उदयनराजेंना विरोध होता आणि त्यांच्याबद्दल तक्रारी होत्या, पण तरी त्याकडे पवार साहेबांनी दुर्लक्ष केले तरीही त्यांनी पक्ष सोडला असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

सातारा जिल्हा हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना नेता मानणारा आहे हा जिल्हा सतत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहिला आहे. पवारांनी ज्याच्यावर पुत्रवत प्रेम केले त्यांनी पक्ष सोडावा याला काय म्हणायाचे, सातारा जिल्ह्यातील जनता पवार साहेबांसोबत आहे आणि नेहमीच राहिल. उदयनरो भोसले यांच्यावर घाणघआती टीका करताना ते म्हणाले मी त्याना कधीच नेता मानत नव्हतो, आम्ही पवारसाहेबांसमोर अत्यंत अदबीने बागतो, त्यांना मान देतो आणि हा माणूस त्यांच्यासमोर कॉलरी उडवतो असले बालीश चाळे करणाऱ्या माणसाला पवारसाहेबांनी सहन केले, त्यांना आज किती वाईट असेल याची मला कल्पना आहे ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT