विश्लेषण

देवेंद्र फडणवीस करणार येडीयुरप्पांना पुन्हा मुख्यमंत्री? 

सरकारनामा ब्युरो

बंगळूर : बेळगावच्या पीएलडी (प्राथमिक भू-विकास) बॅंकेच्या राजकारणामुळे युती सरकार अडचणीत येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जारकीहोळी बंधूंनी अपमानाचा सूड घेण्यासाठी 14 आमदारांसह भाजपमध्ये जाण्याची तयारी चालविली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रमेश जारकीहोळी यांनी संपर्क साधला असून, सतीश जारकीहोळी यांनीही 15 दिवसांत काहीही घडू शकते, असे सांगितले आहे. 

पीएलडी बॅंकेच्या निवडणुकीवरून पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची बाजू उचलून धरली होती. त्यामुळे हेब्बाळकर यांच्या गटाचे पदाधिकारी बॅंकेत विजयी झाले. जारकीहोळी बंधूंना हे रुचले नसल्याने त्यांनी पक्षालाच आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत त्यांनी सूत्रे हलविण्यास सुरवात केल्याचे समजते. 

भाजप प्रवेशासाठी रमेश जारकीहोळी यांनी फडणवीस यांच्यासमोर चार अटी ठेवल्या आहेत. सतीश जारकीहोळी यांना उपमुख्यमंत्रिपद, सहा आमदारांना मंत्रिपद, पोटनिवडणुकीचा खर्च भाजपने करावा, मतदारसंघांना अतिरिक्त अनुदान द्यावे, अशा त्या अटी आहेत. डी. के. शिवकुमार यांच्या बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील हस्तक्षेपास सतीश जारकीहोळी यांनी आक्षेप घेतला असून, आमच्या जिल्ह्याचे राजकारण कसे करावयाचे आम्हाला चांगले माहीत आहे, पुढील 10 वर्षांत आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT