मला पळवून लावले : सदाभाऊ खोत
मला पळवून लावले : सदाभाऊ खोत  
विश्लेषण

मला पळवून लावले : सदाभाऊ खोत 

निवास चौगले

कोल्हापूर : मी पळणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळे पळून जाण्याचा प्रश्‍नच येत नाही, मला हाकलून काढले आहे, पळवून लावले आहे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खासदार राजू शेट्टी यांना लगावला. 

पळवून नेणारे अनेक जण आहेत, पण पळून जाणाऱ्यांचा हा दोष आहे, अशी टीका श्री. शेट्टी यांनी केली होती, त्याला श्री. खोत यांनी या भाषेत प्रत्युत्तर दिले. 

श्री. खोत यांनी आज माजी आमदार महादेराव महाडीक यांची कसबा बावडा येथील राजाराम साखर कारखान्यावर भेट घेतली. यावेळी "राजाराम' चे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, संभाजी महाडीक, माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे आदि उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

श्री. खोत म्हणाले,"मी पळून गेलोच नाही. ज्यांची पात्रता नाही त्यांच्यासमोर मला चौकशीला बोलवले. मीही ताठ मानेने या चौकशीला पुढे गेलो. नंतर माझी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे पळून जाण्याचा विषयच नाही.' 

हातकणंगलेत लोकसभेसाठी मशागत सुरू आहे का ? या प्रश्‍नावर श्री. खोत म्हणाले,"मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याला रानात घात कधी आहे, पेरणी कधी करावी हे सांगायला लागत नाही आणि हे सांगणारी शाळाही कुठे नाही. त्यामुळे योग्यवेळी कुरी खांद्यावर घेऊन पेरणीसाठी सज्ज असेन.' 

नव्या संघटनेच्या प्रतिसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले,"नव्या संघटनेची घोषणा केल्यानंतर मी अनेकांशी संपर्क साधला. काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. इचलकरंजीत संघटनेचा जो पहिला शेतकरी मेळावा असेल त्यात हा प्रतिसाद पहायला मिळेल.' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT