मुंबई : राज्यात भाजप व शिवसेना यांची असलेली युती तोडायची माझी इच्छा नाही. आता जो काही निर्णय घ्यायचा तो भाजपनेच घ्यावा, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेचा चेंडू भाजपच्या कोर्टात टोलावला आहे.
शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज 'मातोश्री' येथे पार पडली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपण सकारात्मक असून आपणाला स्वतःला युती तोडण्याची अजिबात इच्छा नाही, असे स्पष्ट केले. लोकसभेच्या वेळी जे काही ठरले होते, तो शब्द भाजपने पाळावा असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेना मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, शिवसेनेच्या सर्व आमदारांना आज मुक्कामासाठी रंगशारदा येथे ठेवण्यात येणार आहे. राज्यातल्या सत्ता संघर्षात आपले आमदार एकत्र रहावेत, कुणाला आमदार फोडण्याची संधी मिळू नये हा उद्देश यामागे आहे. दरम्यान,
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.