विश्लेषण

आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाकडे 5 सप्टेंबरपर्यंत अहवाल येणार, पुढील सुनावणी 10 सप्टेंबरला

सरकारनामा ब्युरो

मुंबई :  मराठा आरक्षण च्या अभ्यासाबाबत मागास प्रवर्ग आयोगाने तज्ज्ञांची ची समिती नेमली आहे, समिती 5 सप्टेंबर पर्यंत आयोगाला अहवाल देणार आहे, त्यांनंतर तीन महिन्यांत आयोग राज्य सरकारला अहवाल देणार, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई हायकोर्टाला दिली. तीन महिन्यांच्या अवधीवर न्यायालयाने असमाधान व्यक्त केले.
 
मराठा आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना आंदोलन करणे चूक आहे, आंदोलकांनी संयम बाळगावा आणि हिंसक पाऊल उचलू नये असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

मराठा आरक्षणप्रश्नावर शांतता पाळा, हिंसाचार करु नका, असंही मराठा मोर्चेकऱ्या ना न्यायालयाने आवाहन केले. राज्य सरकारनेदेखील विषयाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहून त्वरेने काम करावे अशी सूचना न्यायालयाने दिली. आंदोलकांनी आत्महत्या करू नये, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असेही आज न्यायालयाने सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT