Bachchu_Kadu_
Bachchu_Kadu_ 
विश्लेषण

पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना मतदारांनी जोड्याने मारावे : बच्चू कडू

अरुण जोशी

अमरावती :  " आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षातील मोठे नेते आपला पक्ष सोडून शिवसेना - भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशा सत्तेसाठी  पक्ष बदलणाऱ्या  नेत्यांना मतदारांनी जोड्याने मारले पाहिजे ",असं मत अचलपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. 

सध्या भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या नेत्यांच्या मेगाभरतीवर प्रतिक्रिया देताना आमदार बच्चू कडू म्हणाले, " सध्या मैदानात एकच पहिलवान आहे . कुस्ती होणार की नाही हे माहिती नाही कारण  सत्तेचे लालची लोक आहेत . त्यांना खुर्ची असल्याशिवाय होत नाही .  ज्यांना दहा -दहा वर्षे मंत्रिपद मिळाले असे लोक जर पुन्हा साधे आमदार होण्यासाठी पक्षांतर करीत आहेत . तर यांना  खरे तर पहिले मतदारांनी जोड्याने मारले पाहिजे . मग तो कोणत्याही पक्षचा असो . "

"सत्तेच्या मागे पाळणारे लोकप्रतिनिधी निवडून आलेच नाही पाहिजे . नैतिकता असायला हवी . विचारधारा असायला हवी . आम्ही पंधरा वर्षे एका ठिकाणी स्वतःला विचारधारेच्या खांबाला बांधून घेतलेले आहे . पण सत्तेसाठी पक्षांतर करणारे नालायक लोक या देशात असतील ते हिजड्याची अवलाद आहे . मतदारांनी मतदानातून अशा नेत्यांना रस्त्यावर आणले पाहिजे. आपली सत्तालालसा बरोबर नाही असे ठणकावले पाहिजे," असेही ते म्हणाले . 

तर मुख्यमंत्र्यांनी काढलेली महाजाना देश यात्रा म्हणजे फक्त जनतेच्या पैश्याची उधळपट्टी आहे. सत्तेचा वापर हा पक्ष बांधणीसाठी होत असेल तर ते चुकीचे आहे. या जनादेश यात्रेत जनता कुठेच नाही फक्त आदेश दिसून येत आहे. जनतेच्या प्रश्नावर यात काहीच बोलले जात नाही , अशी  टीका आमदार कडू यांनी केली. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT