विश्लेषण

मोदींच्या 35 मिनिटांच्या भाषणात सर्वाधिक टाळ्या 370 कलमाला!

उमेश घोंगडे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात 35 मिनिटांचे भाषण केले. या संपूर्ण भाषणात त्यांनी विकासाच्या भूमिकेपासून विरोधकांवर टीका करण्यापर्यंत सर्वच विषयांना हात घातला. काश्‍मीरमधील 370 कलम रद्द करण्याच्या भाषणातील मुद्यायावर त्यांनी सर्वाधिक टाळ्या मिळवल्या.

टाळ्यांचा वर्षाव थांबत नसल्याचे लक्षात येताच भाषणाची जागा सोडून पंतप्रधान मोदी क्षणभर पुढे आले आणि वाकून जनसमुदायाला नमस्कार केला.

पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा झाली. सभेला प्रचंड गर्दी होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी याच मैदानावर त्यांची सभा झाली. मात्र, त्या सभेपेक्षा आजच्या सभेची गर्दी अधिक होती. सभेला कडोकाट सुरक्षा व्यवस्था होती. प्रत्येक माणूस मेटल डिटेक्‍टरच्या माध्यमातून तपासल्यानंतरच सभास्थानी पाठवण्यात येत होता. या कडेकोट बंदोबस्ताचा फटका अनेकांना बसला. पक्षाच्या अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले.

मोदी यांनी संपूर्ण भाषणात राहुल गांधी, सोनिया गांधी, कॉंग्रेस, शरद पवार, राष्ट्रवादी यापैकी कुणाचेही नाव घेतले नाही. मात्र, गरीबांचा पैसा लुटणाऱ्यांना गेल्या पाच वर्षात तुरूंगाच्या दारापर्यंत आणले आहे. या पाच वर्षात त्यांना तुरूंगाच बसवून गरीबांचा लुटलेला पैसा वसूल केल्याशिवाय गरीबांचा हा सेवक गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षात राज्यात अत्यंत चांगले काम झाले असून या निवडणुकीतही मतदारांनी मजबूत सरकारसाठी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT