विश्लेषण

नगर जिल्हाधिकाऱयांच्या गाडीवरील दिवा गेला; पाटी आली! 

सरकारनामा ब्युरो

नगर : पंतप्रधानांच्या आदेशानुसार मंत्र्यांचा, अधिकाऱ्यांचा लाल दिवा गेला. पण म्हणून काय झाले ? मस्त मोठ्या आकारात पाट्या तयार करण्याची स्पर्धाच अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये लागली. निर्णय काहीही होवो, पळवाटा आल्याच. आपली ओळख दाखविण्यासाठी काहीतरी युक्ती तर होणारच.
 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी वाहनांवरील दिवे काढले आहेत. मात्र, गाडी विशेष अधिकारी अथवा पदाधिकाऱ्याची आहे हे दर्शविणाऱ्या पाट्या आल्या आहेत. दिव्यांचा रुबाब गेला; मात्र गाड्यांची ओळख कायम ठेवण्यात येत आहे. यातून नगरचे जिल्हाधिकारीही सुटले नाहीत.
 
प्रधानमंत्री मोदी यांनी अधिकारी व पदाधिकारी हे जनतेतून आलेले व जनतेसाठीचे आहेत, हे दर्शविण्यासाठी त्यांच्या आलिशान गाड्यांवरील विशेषत्व दर्शक दिवे काढण्याचे आदेश दिले होते. यातून पोलिसांची वाहने व रुग्णवाहिका वगळण्यात आल्या होत्या. या आवाहनानुसार अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या वाहनांवरील विशेषत्व दर्शक दिवे काढून टाकले. 

वाहन कोणत्या अधिकारी अथवा पदाधिकाऱ्याचे आहे, हे दर्शविण्यासाठी विशिष्ट आकाराच्या पाट्या बसवून घेतल्या जात आहेत. त्यामुळे हे अधिकारी व पदाधिकारी कोणत्या विभागातील व काय हुद्द्यावर आहेत, हे रस्त्यावरील नागरिकांना कळते. या पाट्या गाडीच्या पुढील बाजूस असलेल्या वाहन क्रमांक पाटीच्या वर बसविण्यात येतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT